मुंबई - भारतीय नौदलात सामील होण्यासाठी आलेल्या परिक्षार्थींचा चेंगराचेंगरी झाल्याने काही मुले जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नौदलाने भरतीची जाहिरात वाचून या भरतीसाठी राज्याच्या विविध भागातून १० हजारांहून अधिक तरूण मुंबईतील मालाड येथे दाखल झाले. जाहिरातीत फक्त 12 वी विज्ञान उत्तीर्ण इतकीच पात्रता दिली होती. मात्र, परिक्षेच्या ऐनवेळी फक्त 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थीच परीक्षेला बसू शकतात, असे जाहीर केल्याने एकच गोंधळ झाला. ही जाहिरात वाचून मोठय़ा प्रमाणात परिक्षार्थी मालाडमध्ये दाखल झाले होते. ऐनवेळी नवीन नियम सांगितल्याने संतत्प परिक्षार्थींनी घोषणा देत नाराजी व्यक्त केले. त्यावेळी उपस्थितीत पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने एकच चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक परिक्षार्थी जखमी झाले आहेत. परीक्षेच्या ठिकाणी खाण्या-पिण्याचे कोणतीही सुविधा नव्हती. तसेच नौदलाने आम्हाला फसविले आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया परिक्षार्थींनी व्यक्त केले.
नौदलाने भरतीची जाहिरात वाचून या भरतीसाठी राज्याच्या विविध भागातून १० हजारांहून अधिक तरूण मुंबईतील मालाड येथे दाखल झाले. जाहिरातीत फक्त 12 वी विज्ञान उत्तीर्ण इतकीच पात्रता दिली होती. मात्र, परिक्षेच्या ऐनवेळी फक्त 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थीच परीक्षेला बसू शकतात, असे जाहीर केल्याने एकच गोंधळ झाला. ही जाहिरात वाचून मोठय़ा प्रमाणात परिक्षार्थी मालाडमध्ये दाखल झाले होते. ऐनवेळी नवीन नियम सांगितल्याने संतत्प परिक्षार्थींनी घोषणा देत नाराजी व्यक्त केले. त्यावेळी उपस्थितीत पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने एकच चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक परिक्षार्थी जखमी झाले आहेत. परीक्षेच्या ठिकाणी खाण्या-पिण्याचे कोणतीही सुविधा नव्हती. तसेच नौदलाने आम्हाला फसविले आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया परिक्षार्थींनी व्यक्त केले.