मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी 2017 मध्ये होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपपासून दुरावलेली मागासवर्गीयांची मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून मागासवर्गीय मतदार असलेल्या विभागात रोड शो करण्यात येत आहेत. असाच एक रोड शो नुकताच 2 सप्टेंबर रोजी घाटकोपरमधील रमाबाई कॉलनी ते कामराज नगर पर्यंत करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेत 227 प्रभाग आहेत. या प्रभागांपैकी 50 - 60 प्रभागांमध्ये मागासवर्गीय म्हटल्या जाणाऱ्या बौध्द, अनुसूचित जाती, जमातीच्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही मते कॉंग्रेसची हक्काची समजली जात होती; मात्र हि हक्काची मते लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेसच्या पारड्यात न पडल्याने मुंबईतून कॉंग्रेसचा एकही खासदार निवडून आला नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त पाच आमदार निवडून आले. याचा धसका काँग्रेसने घेतला आहे.
राज्यात व केंद्रात आरएसएस प्रणित भाजपाचे सरकार आल्यापासून गोहत्या बंदी, गुजरातमध्ये मागासवर्गीयांवर झालेला हल्ले, चळवळीचे केंद्र असलेले आंबेडकर भवन पाडण्याला भाजपाचा छुपा पाठिंबा, अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात वक्तव्य केली जात असताना बघ्याची भूमिका घेणारे सरकार, इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी केली जाणारी चाल ढकल अश्या अनेक कारणांमुळे मागासवर्गीय समाज भाजप सरकारवर नाराज आहे. त्यातच महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात आणि झोपडपट्टीधारकां विरोधात कारवाई सुरु केली आहे. या फेरीवाल्यांमध्ये आणि झोपडीधारकांमध्ये उत्तर भारतातील बहुसंख्य मागासवर्गीयांचा समावेश आहे. फेरीवाले आणि झोपडीधारकांविरोधात पालिकेच्या कारवाईला भाजपचे समर्थन आहे, यामुळे हा मतदार भाजपपासून दुरावलेला आहे.
मुंबई महानगरपालिकेत 227 प्रभाग आहेत. या प्रभागांपैकी 50 - 60 प्रभागांमध्ये मागासवर्गीय म्हटल्या जाणाऱ्या बौध्द, अनुसूचित जाती, जमातीच्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही मते कॉंग्रेसची हक्काची समजली जात होती; मात्र हि हक्काची मते लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेसच्या पारड्यात न पडल्याने मुंबईतून कॉंग्रेसचा एकही खासदार निवडून आला नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त पाच आमदार निवडून आले. याचा धसका काँग्रेसने घेतला आहे.
राज्यात व केंद्रात आरएसएस प्रणित भाजपाचे सरकार आल्यापासून गोहत्या बंदी, गुजरातमध्ये मागासवर्गीयांवर झालेला हल्ले, चळवळीचे केंद्र असलेले आंबेडकर भवन पाडण्याला भाजपाचा छुपा पाठिंबा, अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात वक्तव्य केली जात असताना बघ्याची भूमिका घेणारे सरकार, इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी केली जाणारी चाल ढकल अश्या अनेक कारणांमुळे मागासवर्गीय समाज भाजप सरकारवर नाराज आहे. त्यातच महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात आणि झोपडपट्टीधारकां विरोधात कारवाई सुरु केली आहे. या फेरीवाल्यांमध्ये आणि झोपडीधारकांमध्ये उत्तर भारतातील बहुसंख्य मागासवर्गीयांचा समावेश आहे. फेरीवाले आणि झोपडीधारकांविरोधात पालिकेच्या कारवाईला भाजपचे समर्थन आहे, यामुळे हा मतदार भाजपपासून दुरावलेला आहे.
भाजपापासून दुरावलेला व एके काळी आपला हक्काचा असलेला मतदार पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. त्यासाठी घाटकोपरमधील रमाबाई कॉलनी ते कामराज नगर रोड शो करण्यात आला. महापालिका, राज्य व केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात मुंबईत रोड शो केले जाणार आहेत. हे रोड शो विशेष करून मागासवर्गीय मतदार जास्त असलेल्या घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला-पश्चिम, धारावी, वडाळा, नायगाव, वरळी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड या विभागांमध्ये केले जाऊन मागासवर्गीय समाजाची मते पुन्हा काँग्रेसकडे वळवली जाणार आहेत.
मुंबईमध्ये अनुसूचित जाती जमातीची १६ ते १७ टक्के मते आहेत. मुंबईमधील 227 प्रभागांपैकी 50 ते 60 प्रभागांमध्ये मागासवर्गीयांची मते अडीच तीन हजारापासून वीस हजारापर्यंत आहेत. तर इतर अनेक प्रभागांमध्ये मागासवर्गीयांची मते विजयासाठी निर्णायक ठरणारी आहेत. भाजपा आणि शिवसेनेमध्ये आपलाच महापौर बनवण्यासाठी चढाओढ लागली असताना काँग्रेसनेही मागासवर्गीयांची मते आपल्याकडे वळवून या शर्यतीत उडी मारली आहे. पालिकेतील सत्ता मिळवता आली नाही तरी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून विरोधी पक्ष नेते पद आपल्या पदरात पाडून घेण्याची व्युव्हरचना कॉंग्रेसनी आखली आहे.