मुंबई - पालिकेच्या बाजार विभागातील एका अधिकाऱ्याने स्वतःच्या सहीने परिपत्रक काढून पर्यूषण काळात मांसविक्री करणारी दुकाने बंद करण्याचे फर्मान काढले. हा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून मनमानी करणाऱ्या या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आज (30 ऑगस्ट 2016 ) पालिकेच्या सभागृहात करण्यात आली.
पर्यूषण काळात दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवावेत. मांसविक्रीला बंदी असू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत; मात्र पालिकेच्या बाजार विभागातील एका अधिकाऱ्यांने सोमवारी (ता.29) आणि सोमवार (ता. 5) असे दोन दिवस पालिकेच्या क्षेत्रात मांसविक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवावीत, असे परिपत्रक काढले. हे परिपत्रक काढणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी पालिकेच्या सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सभागृहात केली. या परिपत्रकावरून पालिकेच्या सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, असा सवाल विश्वासराव यांनी केला. सपाचे गटनेते रईस शेख यांनीही या प्रकारावर संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणावरून अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
पर्यूषण काळात दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवावेत. मांसविक्रीला बंदी असू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत; मात्र पालिकेच्या बाजार विभागातील एका अधिकाऱ्यांने सोमवारी (ता.29) आणि सोमवार (ता. 5) असे दोन दिवस पालिकेच्या क्षेत्रात मांसविक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवावीत, असे परिपत्रक काढले. हे परिपत्रक काढणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी पालिकेच्या सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सभागृहात केली. या परिपत्रकावरून पालिकेच्या सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, असा सवाल विश्वासराव यांनी केला. सपाचे गटनेते रईस शेख यांनीही या प्रकारावर संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणावरून अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
No comments:
Post a Comment