गोरगरीब, उपेक्षित नाका कामगारांची सरकारने दखल घेण्याची केली मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2015

गोरगरीब, उपेक्षित नाका कामगारांची सरकारने दखल घेण्याची केली मागणी

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 27 Dec 2015   
मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये बांधकाम, नाका आणि असंघटीत क्षेत्रात काम करत असलेल्या लाखो कामगारांचा कोणीही वाली नसल्याने त्यांची सरकारदरबारी असंघटीत कामगार म्हणून नोंद होत नाही. ती नोंद करण्यासाठभ् अनेक प्रकारच्या जाचक अटी या अडचणींच्या ठरत असून सरकारने या अटींसोबतच एक स्वतंत्र वेगळी यंत्रणा राबवून मुंबईसह राज्यातील प्रत्येक शहरांना, इमारतींना सुंदर बनविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाºया या कामगारांची नोंद करावी आणि त्यांना कायद्याने मिळणाºया सर्व सोयी-सवलती उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक व ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी रविवारी केली.

बंजारा नाका कामगार संघटनेकडून १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या बंजारा नाका राज्यव्यापी जनजागृती अभियान रविवारी गोरेगाव पूर्व येथे असलेल्या गोकुळधाम नाका, दिंडोशी स्थानकाजवळीत दिंडोशी पेट्रोलपंप व रेल्वे स्थानकासमोर नाक्यांवर असलेल्या बांधकाम आणि नाका कामगारांना प्रत्यक्ष भेटून ‘उचल्याकार’ांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बंजारा नाका कामगार
संघटनेचे प्रमुख अ‍ॅड. नरेश राठोड आदी उपस्थित होते.इमारती आणि बांधकामापासून सर्व प्रकारचे कामे ही बंजारा, भटका विमुक्त, आदिवासी, दलित आदी समाजाचेच कामगार करत असून त्यांच्या आरोग्यासोबतच रोजगाराच्या हमीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. मात्र त्यांच्यासाठी कोणत्याही राजकीय संघटना, सामाजिक संघटना पुढाकार घेऊन त्यांचे प्रश्न तडीस लावत नसल्याने आज मुंबईतील सुमारे ५०० हून अधिक असलेल्या नाक्यांवरील कामगारांना आपल्या आयुष्याविषयी प्रचंड असुरक्षेची भावना असून रोजगारांसोबतच कोणतीही हमी त्यांना मिळत नाही, याकडेही सरकारने गांभिर्याने लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत आणि या मुंबई, ठाण्यासह रायगड आदी जिल्'ात सर्वांधिक प्रमाणात आंध्र,कर्नाटक, ओरिसा आदी राज्यातील बंजारा महिलांची संख्या सर्वांधिक असून त्यांचेही प्रश्न महिला आणि बालकल्याण विभागाने समजून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली.

*ठाणे, कल्याणमध्येही जनजागृती, *बंजारा नाका कामगार संघटनेतर्फे कल्याण शहर परिसरातील खडकपाडा नाका, शिवाजी
चौक नाका, तिसगाव नाका, मसोबा चौक नाका, विजय नगर नाका इत्यादी नाक्यावर भेटी
देऊन असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या हक्काविषयी जनजागृती करण्यात आली.
नाक्यावर आपल्या समाजातील बंधू-भगिनी रोजीरोटीसाठी अंगमेहनतीचे काम करतात
त्यांना त्यांच्या अडीअडचणीविषयी विचारणा करण्यात आली असता अनेक अडचणी समोर
आल्या नाक्यावर उभे राहण्यापासून ते मजूरीचा मोबदला मिळेपर्यंत अनेक समस्या
असून त्या सोडविण्यासाठी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे सचिव अनिल
राठोड यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यात जनजागृती करण्यात आली. यात अनेक विविध
प्रशासकीय विभागाती अधिकारी कर्मचारीही सहभागी झाले होते.

रोजीरोटीसाठी अतिशय प्रामाणिकपणे अंगमेहनतीचे काम करणाºया बंजारा समाजातील
बंधू-भगिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्याकरिता बंजारा नाका कामगार
संघटना प्रयत्न करीत आहे.  त्या संघटनेला हातभार लावण्यासाठी कष्टकरी समाज
बांधवांचे सुख-दु:खू जाणून घेण्यासाठी कल्याण शहरातील समाजप्रेमी अधिकारी -
कर्मचारी यांनी सहकायार्चे हाथ पुढे केले आहे ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामध्ये
रमेश राठोड (स्थापत्य अभियंता),सेवालाल राठोड (विस्तार अधिकारी) विठ्ठल पवार
(ब्रृहन्मुबई महानगर पालिका ),आकाश राठोड (ईलेक्ट्रीकल इंजिनियर),प्रदीप
जाधव(टि.डि.सी.बँक) आणि अनिल राठोड (मुख्याध्यापक) इत्यादी कर्मचारी-अधिकारी
यांनी पुढाकार घेतला आहे.

Displaying laxman.JPG
Displaying laxman.JPG

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad