आपल्या देशात गेल्या वर्षभराहून अधिक काळ जातीवादाने तोंड मोठ्या प्रमाणात वर काढले आहे. त्याला कारणही तसेच आहे. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर सरकार मधील मंत्र्यांनी, खासदारांनी आणि सरकारचे रिमोट कंट्रोल असलेल्या आरएसएसमधील पदाधिकाऱ्यांकडून अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. याचे पडसाद सबंध भारतात उमटत आहेत. याबाबत झालेल्या टिके नंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच असहिष्णूतेबाबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
अशीच वादग्रस्त वक्तव्य हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंड्रीय मंत्री महेश शर्मा, खासदार साक्षी महाराज आणि विधान परिषदेचे आमदार संगीत सोम यांनी केले होते. त्यांना भाजपा पक्ष अध्यक्ष अमित शहा यांना चांगलीच समज द्यावी लागली आहे. दादरी हत्या आणि गोमांसाबद्दल वादग्रस्त विधाने करण्यामुळे वाद ओढवून घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर अमित शहा नाराज झाले आहेत. त्यांनी पक्षादेश काढून या नेत्यांना गप्प राहण्याची सूचना केली होती.
अशी वादग्रस्त विधाने करून भारतात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे भाजप आणि आरएसएस दाखवत आहे. मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करतानाच अनुसूचित जाती व मागासवर्गीयांचे आरक्षण काढून घेण्याचे आरक्षणाचा फेरविचार करण्याचे वक्तव्य आरएसएस प्रमुखांकडून करण्यात आले होते. परंतू बिहार मध्ये असलेली मागासवर्गीय समाजाची मते मिळणार नाहीत अशी भीती वाटल्याने आरएसएस प्रमुखांना आपले विधान मागे घ्यावे लागले होते. आरक्षण आणि मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्याने भाजपाला बिहारमध्ये निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागली होती.
भाजपा नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधाने होत असून त्यामुळे पक्ष आई सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. मागील वर्षी विरोधकांनी सरकारला अनेकवेळा कोंडीत पकडल्यावर खुद्द पंतप्रधान मोदींनी या वाचाळवीरांची कानउघडणी करण्यात आली होती तसच त्यांना लक्ष्मणरेषा न ओलांडण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र तरीही ही विधाने सुरूच राहिल्याने मोदींनी निर्वाणीचे अस्त्र उपसले होते वादग्रस्त विधाने न थांबवल्यास आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊ असा इशारा मोदी यांनी दिला होता.
साध्वी निरंजन ज्योती, साक्षी महाराज यांचे वक्तव्य, तसेच आग्र्यातील सामूहिक धर्मांतर या व अशा अनेक मुद्यांवरून विरोधकांनी गदारोळ माजवत नेत्यांच्या वक्तव्यांवर पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण करावे अशी मागणी करत मागील वर्षी संसदेचे कामकाज ठप्प पाडले होते. भाजपा सरकारवर अनेकवेळा टीकास्त्रही सोडण्यात आले. या सर्वांमुळे हैराण झालेल्या मोदींनी राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले होते. मोदींनी त्यावेळी स्पष्ट शब्दांत नाराजी नोंदवली होती. मोदी यांच्या नाराजी नंतरही भाजपा नेते आणि आरएसएसने वादग्रस्त विधाने बंद केलेली नाहीत.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले होते की, या देशात मुसलमान राहू शकतात मात्र त्यांनी गोमांस खाणे बंद करायला हवे. मात्र टीका झाल्यावर खट्टर यांना आपले वक्तव्य मागे घ्यावे लागले होते. महेश शर्मा आणि संगीत सोम यांनी दादरी गावाला भेट दिली होती. तिथे मुस्लिम व्यक्तीची झालेली हत्या म्हणजे अपघात होता, असे शर्मा म्हणाले तर पोलिस निरपराधांना अडकवत असले तर मुझफ्फरनगरसारख्या प्रतिक्रियेचा इशारा सोम यांनी दिला होता.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आणि हिंदुत्ववादी नेते साक्षी महाराज यांनीही प्रक्षोभक विधाने करून वातावरण तापवले होते. विजयवर्गीय यांनी शाहरूख खान भारतविरोधी असल्याचे म्हटले होते. नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तो काही निवडक लोकांच्या आंतरराष्ट्रीय समुहामध्ये सामील झाला असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून देशभरात अनेकांनी विजयवर्गीय यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून आपल्या आधीच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.
अशी वादग्रस्त विधाने करून भारतात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे भाजप आणि आरएसएस दाखवत आहे. मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करतानाच अनुसूचित जाती व मागासवर्गीयांचे आरक्षण काढून घेण्याचे आरक्षणाचा फेरविचार करण्याचे वक्तव्य आरएसएस प्रमुखांकडून करण्यात आले होते. परंतू बिहार मध्ये असलेली मागासवर्गीय समाजाची मते मिळणार नाहीत अशी भीती वाटल्याने आरएसएस प्रमुखांना आपले विधान मागे घ्यावे लागले होते. आरक्षण आणि मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्याने भाजपाला बिहारमध्ये निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागली होती.
भाजपाने सत्तेत येताना अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवले होते. केंद्रात सरकार येवून वर्षभराहून अधिक काळ झाला तरी कोणतेही अच्छे दिन भाजपाला आणता आलेले नाहीत. महागाई आहे तशीच आहे. भाजपच्या वाचाळविर नेत्यांमुळे मुसली, आणि मागासवर्गीय समाजात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाने जे वातावरण आपले सरकार आल्यापासून बनवले आहे त्याच्या विरोधातील राग बिहार निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवला आहे. बिहारमध्ये भाजपाला तेथील मतदारांनी नाकारले आहे. लोकसभेच्या मध्यावधी निवडणूकामध्येही भाजपाचे पानिपत झाले आहे. भाजपच्या अश्या वागणुकीमुळे मतदारांनी भाजपाला नाकारण्यास सुरु केले आहे.
नुकतेच सिने अभिनेता आमिर खान याने आपल्या पत्नी मध्ये जो संवाद झाला तो एका कार्यक्रमात बोलून दाखवला. परंतू प्रस्थापित मिडीया आणि वृत्त वाहिन्यांनी आमिर खान जे बोललाच नाही ते त्याच्या तोंडात घालून अर्धवट वाक्य दाखवून वाद निर्माण केला. आमिर खान नेमक काय बोलला याची खात्री न करताच त्यावर तीव्र प्रतिक्रीय देण्यात आल्या. आमिरच्या घरा समोर हिंदुत्ववादी म्हटल्या जाणाऱ्या संघटनेने निदर्शने केली आणि आमिर खानला देश सोडून जाण्याचा सल्ला देण्यात आला.
आता तर रायपूर येथे एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाच्या कोणत्याही घटकाला दुखावणारे वक्तव्य संघाच्या सदस्यांनी करू नये, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. संघाच्या सदस्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच, कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वादग्रस्त विधाने करण्यापासून दूर राहिले पाहिजे. ‘प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याची किंवा तिची मतांमुळे समाजातील एखाद्या व्यक्तीच्या किंवा घटकाच्या भावना दुखवू नयेत,‘ असे भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
आपल्या देशात प्रकार घडत असताना अनेक विचारवंत साहित्तिक आणि कलाकार यांनी असहिष्णूते विरोधात आपल्याला सरकार कडून मिळालेले पुरस्कार परत केले आहेत. भारतीय नागरिक आणि मागासवर्गीय लोकांमध्ये सरकारच्या वागण्याची चीड निर्माण झाली आहे. अशी चीड लोकांमध्ये निर्माण झाली असताना सरकारविरोधात लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. लोकांमध्ये चर्चा होत असताना आंबेडकरी नेते मात्र गप्प आहेत. लोकांमधील चीड कमी करण्यासाठी सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर सुरु केला आहे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले, बाबासाहेबांची १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे, संविधान दिन धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. देशातील काही राज्याच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका डोळ्या समोर ठेवून आंबेडकरी जनतेला आकर्षित करण्याचा प्रकार आहे याची दखल घेण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment